5. इंदिरा गांधी आरोपीच्या पिंजऱ्यात Indira Gandhis Statement and Cross examination in Allahabad High court

जेव्हा इंदिरा गांधी साक्षीदार म्हणून येण्याचे ठरले तेंव्हा हा खटला एकदम प्रकाश झोतात आला. प्रसार माध्यमांची उत्सुकता शिगेला पोचली. देशाच्या इतिहासात तोपर्यंत कधीही पंतप्रधान पदासारख्या अत्यंत महत्त्वाच्या पदावरील व्यक्ती साक्षीदार म्हणून कुठल्याही कोर्टासमोर उभा राहिला नव्हता

4. निळी पुस्तिका आणि विशेषाधिकार BLUE BOOK and State Privileges

इंदिरा गांधींनी सरकारी यंत्रणेचा गैरवापर केला की नाही हे ठरवण्यासाठी ही कागदपत्रे महत्वाची आहेत असे श्री  शांतीभूषण यांना वाटत होते. सरकारने असे करण्यास नकार दिला.  कारण सांगितले की ही कागदपत्रे द्यावी की नाहीत  यासंबंधी राज्याला (state) काही विशेष अधिकार (Privileges) आहेत. ज्या कागदपत्रांची मागणी राजनारायण यांचा पक्ष करत होता त्याला नाव होते ब्लू बुक (BLUE BOOK).  आणि त्यामध्ये पंतप्रधान प्रवासात किंवा दौऱ्यावर असताना त्यांच्या संरक्षणासाठीचे नियम आणि मार्गदर्शक सूचना समाविष्ट होत्या. या पुस्तिकेत असे नमूद होते की पंतप्रधान दौऱ्यावर असताना संबंधित राज्याने त्यांच्या संरक्षणाचा आणि त्यांच्या बैठका आणि सभांची व्यवस्था  करायची. या व्यवस्थेचा खर्च देखील ज्या राज्यात हा दौरा आहे त्या राज्याने करायचा. पंडित जवाहरलाल नेहरू आणि लालबहादूर शास्त्री पंतप्रधान पदावर असेपर्यंत असाच दंडक होता.

3. पुनः सर्वोच्च न्यायालयात Raj Narain Appealed in Supreme Court

सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे नमूद केले की या खटल्यामधील पॅराग्राफ 5 हा अजिबात अस्पष्ट किंवा संदिग्ध नाही. त्याच बरोबर न्यायमूर्ती ब्रूम यांनी यशपाल कपूर यांच्याशी संबंधित काढून टाकलेल्या महत्त्वाच्या इंट्रोगेटरी (प्रश्नावल्या) सुप्रीम कोर्टा ने पुन्हा खटल्यामध्ये समाविष्ट केल्या. न्या. ब्रुम यांच्या अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला त्यांनी चुकीचे ठरवले. एकंदरीतच राजनारायण पक्षाचे पारडे पुनः एकदा जड झाले.

Raj Narain vs Indira Gandhi

2. खटल्यास सुरुवात Election Petition against Indira Gandhi

परंतु राज नारायण यांनी आपल्याकडे आशा वकिलांना देण्यासाठी पैसे नाहीत असे सांगितले. परंतु नंतर राज नारायण यांनी उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री श्री सी. बी. गुप्ता यांची भेट घेतली. गुप्ता आणि श्री शांतीभूषण यांचे चांगले संबंध होते.  हा आधार घेऊनच श्री शांतीभूषण यांनी राजनारायण यांचा खटला लढवावा अशी गळ त्यांना गुप्ता यांच्याद्वारे घालण्यात आली आणि ती त्यांनी मान्य केली.

1. आणीबाणीची पार्श्वभूमी Before decleration of emergency in india

हा खटला अनेक अंगाने महत्त्वाचा होता. 1971 च्या निवडणुकीद्वारे श्रीमती इंदिरा गांधींना पंतप्रधान पद मिळाले होते. त्या पंतप्रधान पदासाठी आवश्यक असणारे लोकसभेचे सदस्यत्व या खटल्याद्वारे धोक्यात येत होते. जर हा खटला राजनारायण यांनी जिंकला आणि जर इंदिरा गांधींची निवडणूक रद्दबातल ठरली तर इंदिरा गांधींचे पंतप्रधान पद पण धोक्यात येणार होते

गदर – एक खरी खुरी प्रेम कथा Gadar a true love story

आपण सर्वांनी 2001 साली  ‘गदर – एक प्रेम कथा’ नावाचा चित्रपट पाहिला असेल. अनेक वेळ 15 ऑगस्ट  किंवा 26 जानेवारी आली की देशभक्तिपर चित्रपट म्हणून अनेक वाहिन्यांवर (चॅनल्स वर) तो दाखवण्यात येतो.  त्यामध्ये सनी देओल यांनी केलेली तारासिंग या ट्रक ड्रायव्हरची भूमिका खूप गाजली. “हिंदोस्तान जिंदाबाद” म्हणत हँडपंप उखाडणारा सनी देओल सर्वांना जाम भावला होता. पाकिस्तानी लोकांची ठासून आपल्या बायका-पोरांना भारतात घेऊन येणाऱ्या तारा सिंग चे सगळ्यांनाच कौतुक वाटले. चित्रपट देखील तूफान चालला. यामध्ये तारा सिंग च्या पत्नीची,  सकीना नावाच्या मुलीची भूमिका केली होती अमिषा पटेल हिने. आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती नसेल की  ही केवळ चित्रपटाची स्टोरी नाही तर खरोखर वास्तवात घडलेली घटना होती.

my school

माझी शाळा

आपली शाळा आणि बालपणीच्या शाळे विषयीच्या आठवणी या कवितेतून कवि कबीर यांनी सादर केल्या आहेत. आपल्याला ही कविता निश्चित आवडेल अशी आशा.

Jamadar Bapu Lamkhade जमादार बापू लामखडे

आजच्या या जगामध्ये जिथे गँगस्टर लोकांना आयडॉल  म्हणून प्रस्थापित केले जात आहे तिथे अशा साध्या, सरळ, प्रामाणिक, आणि कर्तव्यदक्ष कस्टम अधिकाऱ्याची ही कहाणी फार कमी लोकांना माहिती आहे हे आपले दुर्दैव. मिर्झा उर्फ हाजी मस्तान हा मुंबईचा डॉन देखील ज्याला वचकून असायचा अशा या कस्टम खात्यातील  साध्या जमादाराची ही कहाणी आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आणि आदर्श आहे.

Khandoba of jejuri killing Mani and Mall

भुंगा .. सव्वा लाखाचा Aurangazeb and war at Jejuri temple history

मित्रांनो आपण ‘झाकली मूठ सव्वा लाखाची’ ही म्हण ऐकली असेल पण सव्वा लाखाच्या भुंग्याची हकीकत तुम्हाला माहीत नसेल. ही भुंग्याची गोष्ट संबंधित आहे आपल्या सर्वांच्या आराध्य खांडेरायशी आणि जेजूरी गडाशी.
या जेजूरी गडावर त्याकाळच्या जगातील सर्वात सामर्थ्यशाली बादशहाला, औरंगजेबला नतमस्तक व्हावे लागले होते. त्याची हकीकत मोठी रोमांचक आहे.

nirvaan-shatakam-निर्वाण-षटकम्/

भगवद गीता जरी वेदांत तत्वज्ञानाचे सार असले तरी त्याहीपेक्षा कमी शब्दांमध्ये वेदांत तत्वज्ञानाचे सार स्वतः शंकराचार्यांनी सांगून ठेवलेले आहे. हे सार त्यांनी केवळ सहा कडव्यांमध्ये सांगून टाकले. या सहा कडव्यानाच षटकम् असे म्हटले आहे. आणि या षटकांमध्ये आत्म म्हणजे काय किंवा मी कोण आहे हे सांगितले असल्यामुळे यालाच ‘आत्मषटकम्’ असेही म्हणतात. आत्म्याचे स्वरूप जाणून घेतल्यावर निर्वाण प्राप्त होते. त्यामुळे याला ‘निर्वाण षटकम्’ असेही नाव आहे.

error: