Author name: कारभारी

कथेची कथा अर्थात गुणाढ्याची बृहत् कथा Gunadhya’s Brihatkatha

सम्राट हाल हे एक दिवस जलक्रीडा करत असताना त्याच्या मनात बरेच दिवसांपासून असलेले एक शल्य उफाळून आले. त्याने लगेचच प्रतिज्ञा केली की जोपर्यंत त्याला असक्खलीत संस्कृत बोलता येणार नाही तोपर्यंत तो आपल्या प्रजेला तोंड दाखवणार नाही. शेवटी राजाच तो. आणि बाल हट्ट, स्त्री हट्ट आणि राजहट्ट यापुढे कोणाचे काही चालत नसते हेच खरं.

कसा शिकवला धीरूभाई अंबानी यांनी कलकत्त्याच्या दलालांना धडा

शेअर मार्केट मध्ये शेअर्स खरेदी विक्री व्यतिरिक्त इतरही अनेक रंजक घडामोडी घडतात. इतिहासाच्या पोटात डोकावले म्हणजे असे अनेक रंजक किस्से आपल्या हाती लागतात. एकदा कलकत्त्याच्या शेर मार्क्र्त दळलांच्या एका टोळीने रिलायन्स कंपनीला पेचाट पकडण्याचा प्रयत्न केला होता. तो आपल्या निर्णय क्षमतेने आणि हिमतीने धिरूभाई अंबंनींनी कसं हाणून पाडला याचा इतिहास मनोरंजक आहे. हा लेख रिलायन्स कंपनीचे चेअरमन धीरूभाई अंबानी आणि काही शेअर ब्रोकर्स यांच्यातील डावपेचांचे युद्ध याशी संबंधित आहे. या लेखाची मजा घेण्यासाठी तुम्हाला शेअर मार्केट संबंधी किमान जुजबी माहिती आहे असे गृहीत धरलेले आहे

Story of missed IT revolution अर्थात भारतीय संगणक क्रांतीचा इतिहास

एक संगणक अनेक जणांच्या रोजगार हिसकावून घेईल अशी भीती त्यांना वाटत होती. बाहेरच्यांनीच नव्हे तर खुद्द काँग्रेस पक्षांमध्ये देखील राजीव गांधीला या बाबतीत विरोध सुरु झाला. पाठीमागे कुजबुज सुरु झाली. बुजुर्ग नेते नाराज झाले. जुने  ढुड्ढाचार्य (old guards)  विरोध करू लागले.  हे धोरण समाजवादी चेहरा  असलेल्या काँग्रेसला परवडणार नाही. आणि याचा परिणाम कामगार वर्गांच्या पाठिंब्यावर होईल असे कारण ते पुढे करत. एवढेच काय तर शासकीय प्रयत्नाने ECIL मध्ये तसेच काही खाजगी कंपन्यांच्या प्रयत्न यामुळे आकाराला येत असलेल्या या उद्योगाला अडथळा कसा आणता येईल याचे प्रयत्न झाले. खुद्द काँग्रेसमध्येच या उद्योगाला “स्क्रू ड्रायव्हर इंडस्ट्री” नावाने हिणवले जात असे.

पुरुषोत्तम आणि पद्मावती – ओरिसाच्या राजाची गोष्ट

आपल्या भारताच्या पुर्वेस ओडिसा नावाचे एक राज्य आहे बऱ्याच जणांनी ओडिसाला भेट दिली असेल. ओडिसा मध्ये भगवान जगन्नाथाचे सुंदर असे मंदिर पुरि या शहरामध्ये आहे. पुरी मध्ये दरवर्षी साधारणतः आषाढ महिन्या मध्ये रथयात्रा निघते. या पुरी शी, भगवान जगन्नाथा शी आणि तेथील राजे पुरुषोत्तम देवांशी संबंधित अशी ही एक कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे.

ईंधन Indhan

बालपणीच्या रम्य आठवणींवर अनेक कवींनी सुंदर कविता लिहिल्या आहेत. इंधन ही अशीच ही गुलजार यांची सुंदर कविता. पण ही केवळ बालपणीच्या रम्य आठवणींची कविता नाही. आपल्या नजरेसमोर जीवलग मित्रांच्या मृत्यू पाहणार्‍या एका प्रतिभावंताची ही कविता आहे.एका विषयापासून सुरुवात करून अत्यंत वेगळा आणि गंभीर शेवट करण्याची गुलजार यांना विलक्षण हातोटी आहे. गुलजार यांची त्रिवेणी आणि इतर काव्य ज्यांनी वाचली असेल त्यांना या त्यांच्या सामर्थ्याची पूर्ण कल्पना असेल …..
गाईच्या शेणाच्या गोवर्‍या थापतेवेळी बालवयात खेळलेले खेळ आणि त्याच्या आठवणी मित्राच्या मृत्यूनंतर अस्वस्थ करतात …. कवीस आणि तुम्हा-आम्हासही

कृष्ण कि चेतावणी (Krishna ki chetavani)

वर्षों तक वन में घूम घूम, बाधा विघ्नों को चूम चूमसह धूप घाम पानी पत्थर, पांडव आये कुछ और निखर सौभाग्य न सब दिन होता है, देखें आगे क्या होता है मैत्री की राह दिखाने को, सब को सुमार्ग पर लाने कोदुर्योधन को समझाने को, भीषण विध्वंस बचाने को भगवान हस्तिनापुर आए, पांडव का संदेशा लाये दो न्याय अगर तो …

कृष्ण कि चेतावणी (Krishna ki chetavani) Read More »

शक्ति और क्षमा shakti aur kshama

युधिष्ठिराचे मन युद्धाने उद्विग्न झालेले असते . त्याला प्रामाणिकपणे वाटत असते  की या प्रचंड नरसंहाराला तोच जबाबदार आहे. त्याने जर मनात आणले असते तर तो हे युद्ध थांबू शकला असता. युधिष्ठिराला वाटते की एवढ्या सर्व बांधवांना आणि क्षत्रियांना मारून मिळवलेला हा विजय रक्तलांछित आहे, कलंकित आहे. त्यामुळे न महाभारताच्या विजयाला अर्थ आहे, न त्याद्वारे प्राप्त होणाऱ्या राजसत्तेला. पश्चातापाने दग्ध होऊन युधिष्टिर हे जाहीर करतो की त्याची जगण्याची देखील इच्छा राहिलेली नाही.   
पण येथे भीष्मांमधील खरा राजकारणी, नीतिज्ञ आणि खरा क्षत्रिय आपल्यासमोर रामधारी सिंह दिनकर उभा करतात.

आषाढस्य प्रथम दिवसे अर्थात मेघदूत हिन्दी मे

ऐसा ही एक प्रेमकाव्य हैं ’मेघदूतम’। जिसे दुनियाभर के बुद्धीजीवीयों ने सराहा हैं, चाहा है। यह एक प्रेमसन्देश है। जिसे शापीत यक्ष ने अपनि प्रिया के लिये मेघरुप सन्देशवाहक के साथ भेजा है। यक्ष केवल प्रियतम के लिये सन्देश ही नहि भेजता अपितू मेघ को वहां तक जाने का मार्ग भी बताता है। उस मार्ग में आने वाले नगर, नगरजन, नदियाँ, पर्वत और निसर्ग इन सब की विशेषताओं का भी वर्णन करता है। किंतु प्रेमसन्देश इस काव्य की आत्मा है।


सुंदर मराठी भाषा

मराठी भाषा अतिशय चमत्कार करू शकणारि आहे.जेवढे लालित्य भषाविलास, वाग्वैभव संस्कृत दाखवु शकते तेवढेच सामर्थ्य मराठीमधेहि आहे.व्याकरण, अलंकार, शब्दविभ्रम, वृत्तरचना यांचा समृद्ध असा खजिना हा संत अनि पंत कविमंडळींनी आनि शाहिरि कवींनि वारसारुपाने मागे ठेवलेला आहे. अतिशयोक्ति अलंकार मुंगी व्याली शिंगि झाली तिचे दूध किती?अठरा रांजन भरुन उरले प्याले दोन हत्ती. दमडिचं तेल आणलंमामाजींची शेंडि …

सुंदर मराठी भाषा Read More »

error: