आज 25 जून आहे. आजच्या दिवशी 1975 साली इंदिरा गांधी यांनी आणीबाणीची घोषणा केली भारताच्या लोकशाहीचा इतिहासात हा काळाकुट्टा अध्याय जोडला गेला. या सर्वांची सुरुवात एका विशिष्ट अशा राजकीय परिस्थितीमुळे निर्माण झाली होती. आणीबाणी का लागू करण्यात आली असे विचारले तर अविश्वसनीय परंतु वापरून वापरून गुळगुळीत झालेली उत्तरे मिळतात. आजही अनेक लोकांना या आणीबाणीच्या मागची पार्श्वभूमी माहिती नाही.
काही मोजक्या पुस्तकांमुळे मधून मिळणाऱ्या त्रोटक माहितीच्या आधारे त्यांचे आणीबाणीचे आकलन आकाराला येते. कुठलाही चिकित्सक दृष्टिकोन न ठेवता या अशा प्रचारकी मतांना सत्य मानण्यात येते. दुर्दैव असे की भारतातील तरुण पिढी आणि अजाण मतदार वर्षानुवर्षे अशा भ्रामक समजुतीखाली राहतात. चांगले राजकीय विचारवंत आणि उच्चशिक्षित, उच्च विद्या विभूषित वर्ग देखील याच गोष्टींना सत्य मानून आयुष्यभर आपले राजकीय अज्ञान हिरारीने मांडतात.
कारण आपल्याला पूर्ण बाजू माहिती नसते. इतिहास लेखनामध्ये एक प्रसिद्ध ऊक्ती आहे की ‘जोपर्यंत सिंह इतिहास लिहायला सुरुवात करणार नाही तोपर्यंत इतिहासामध्ये तुम्हाला शिकाऱ्यांचाच गौरव वाचायला मिळेल’. म्हणजेच तुम्हाला केवळ एका बाजूने लिहिलेला इतिहास वाचून खरा इतिहास कळणार नाही. तर दुसऱ्या बाजूचा इतिहास देखील वाचावा लागेल तेंव्हा कालखंडांचे, घटनांचे खरे आकलन आपल्याला घडेल.
त्यामुळे आतापर्यंत अज्ञात असलेल्या अशा अनेक घडामोडींचा, घटनांचा आणि संदर्भांचा आधार घेऊन आणीबाणी विषयी ही एक लेखमाला आपल्या सर्वांसाठी इथे सादर करतोय.
- 1. आणीबाणीची पार्श्वभूमी Before decleration of emergency in indiaहा खटला अनेक अंगाने महत्त्वाचा होता. 1971 च्या निवडणुकीद्वारे श्रीमती इंदिरा गांधींना पंतप्रधान पद मिळाले होते. त्या पंतप्रधान पदासाठी आवश्यक असणारे लोकसभेचे सदस्यत्व या खटल्याद्वारे धोक्यात येत होते. जर हा खटला राजनारायण यांनी जिंकला आणि जर इंदिरा गांधींची निवडणूक रद्दबातल ठरली तर इंदिरा गांधींचे पंतप्रधान पद पण धोक्यात येणार होते
- 2. खटल्यास सुरुवात Election Petition against Indira Gandhiपरंतु राज नारायण यांनी आपल्याकडे आशा वकिलांना देण्यासाठी पैसे नाहीत असे सांगितले. परंतु नंतर राज नारायण यांनी उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री श्री सी. बी. गुप्ता यांची भेट घेतली. गुप्ता आणि श्री शांतीभूषण यांचे चांगले संबंध होते. हा आधार घेऊनच श्री शांतीभूषण यांनी राजनारायण यांचा खटला लढवावा अशी गळ त्यांना गुप्ता यांच्याद्वारे घालण्यात आली आणि ती त्यांनी मान्य केली.
- 3. पुनः सर्वोच्च न्यायालयात Raj Narain Appealed in Supreme Courtसुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे नमूद केले की या खटल्यामधील पॅराग्राफ 5 हा अजिबात अस्पष्ट किंवा संदिग्ध नाही. त्याच बरोबर न्यायमूर्ती ब्रूम यांनी यशपाल कपूर यांच्याशी संबंधित काढून टाकलेल्या महत्त्वाच्या इंट्रोगेटरी (प्रश्नावल्या) सुप्रीम कोर्टा ने पुन्हा खटल्यामध्ये समाविष्ट केल्या. न्या. ब्रुम यांच्या अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला त्यांनी चुकीचे ठरवले. एकंदरीतच राजनारायण पक्षाचे पारडे पुनः एकदा जड झाले.
- 4. निळी पुस्तिका आणि विशेषाधिकार BLUE BOOK and State Privilegesइंदिरा गांधींनी सरकारी यंत्रणेचा गैरवापर केला की नाही हे ठरवण्यासाठी ही कागदपत्रे महत्वाची आहेत असे श्री शांतीभूषण यांना वाटत होते. सरकारने असे करण्यास नकार दिला. कारण सांगितले की ही कागदपत्रे द्यावी की नाहीत यासंबंधी राज्याला (state) काही विशेष अधिकार (Privileges) आहेत. ज्या कागदपत्रांची मागणी राजनारायण यांचा पक्ष करत होता त्याला नाव होते ब्लू बुक (BLUE BOOK). आणि त्यामध्ये पंतप्रधान प्रवासात किंवा दौऱ्यावर असताना त्यांच्या संरक्षणासाठीचे नियम आणि मार्गदर्शक सूचना समाविष्ट होत्या. या पुस्तिकेत असे नमूद होते की पंतप्रधान दौऱ्यावर असताना संबंधित राज्याने त्यांच्या संरक्षणाचा आणि त्यांच्या बैठका आणि सभांची व्यवस्था करायची. या व्यवस्थेचा खर्च देखील ज्या राज्यात हा दौरा आहे त्या राज्याने करायचा. पंडित जवाहरलाल नेहरू आणि लालबहादूर शास्त्री पंतप्रधान पदावर असेपर्यंत असाच दंडक होता.
- 5. इंदिरा गांधी आरोपीच्या पिंजऱ्यात Indira Gandhis Statement and Cross examination in Allahabad High courtजेव्हा इंदिरा गांधी साक्षीदार म्हणून येण्याचे ठरले तेंव्हा हा खटला एकदम प्रकाश झोतात आला. प्रसार माध्यमांची उत्सुकता शिगेला पोचली. देशाच्या इतिहासात तोपर्यंत कधीही पंतप्रधान पदासारख्या अत्यंत महत्त्वाच्या पदावरील व्यक्ती साक्षीदार म्हणून कुठल्याही कोर्टासमोर उभा राहिला नव्हता