कोहिनूर हिरा आणि दिल्लीतील भीषण कत्तल

शेअर करा

नादिरशहा अक्षरश चवताळला. नादिरशहा ने इतिहासात कुप्रसिध्द असलेली ‘दिल्लीची कत्तल’ घडवून आणली. त्याने आपल्या सैन्यास दिल्लीत सरसकट कत्तल करण्याचा हुकूम दिला. तो 22 मार्च 1739 ला सुनहरी मशिदीत आला. नगारे आणि तुतारींच्या घोषात त्याने आपल्या सैनिकांसमोर आपली तलवार म्यानातून बाहेर काढून हवेत उंच धरली. सैनिकांसाठी हा कत्ल-ए-आम चा आदेश होता. हजारो शस्त्रधारी सैनिक रस्त्यावर उतरले आणि दिसेल त्याची कत्तल करत सुटले. हजारो निष्पाप नागरिक यात मारल्या गेले. प्रचंड प्रमाणात मालमत्तेची जाळपोळ आणि नासधूस झाली. दिल्ली अक्षरशः बेचिराख करण्यात आली. दिल्लीचा बादशाह मोहम्मद शाह रंगीला याला अक्षरशः जीवाची भीक मागावी लागली. काही तासांनी जेंव्हा नादीर ने पुन्हा आपली तलवार म्यान केली तेंव्हाच ही कत्तल थांबली. असे म्हणतात की दिल्ली सतत 57 दिवस जळत होती. एका अंदाजानुसार, काही तासातच सुमारे 20 ते 30 हजार बायका पुरुष आणि लहान मुलेदेखील या कत्तलीत मारल्या गेली. जवळ जवळ 10 हजार बायका पोरांना गुलाम करण्यात आले.


शेअर करा

केशाने आज कंपनीचे नाव राखले

शेअर करा

शनिवार उजाडला. रात्री दहाला खेळ सुरू झाला. पडदा उचलला गेला. नाचणाऱ्या वल्लरीच्या ऐवजी, शांत आणि संयमी शारदेच्या रुपात केशवचे स्टेजवर आगमन झाले. केशवचा प्रवेश एवढी प्रभावशाली होती की ते टाळ्यांच्या कडकडाट झाला. नाटक उत्तरोत्तर रंगत गेले. प्रत्येकाने जीव ओतून काम केले. केशवने गायलेल्या प्रत्येक गाण्यासाठी ‘वन्स मोअर’’ आला. विशेषतः ‘मूर्तिमंत भीती उभी’ या हे पद तर इतके रंगले की त्याला सलग, सहा वेळा ‘वन्स मोअर’ मिळाला.

परंतु, यामुळे बारा वर्षाचा केशव थकून गेला. पहिलाच दिवस आणि इतके गायन. थकवा अपरिहार्य होता. शेवटी व्यवस्थापक म्हैसकर स्टेजवर आले आणि त्यांनी केशवच्या वयाचा आणि प्रकृतीचा विचार करावा अशी सर्वांना विनंती केली.

“एक शेवटचा वन्स मोअर रे म्हैसकर!” शाहू महाराजांनी त्यांच्या आसनावरून ओरडले. केशव गायला. महाराज आणि सभागृह मंत्रमुग्ध झाले.


शेअर करा
sant_tukaram

वीट

शेअर करा

‘प्रभात, चा संत तुकाराम हा चित्रपट पाहून बऱ्याच जणांचे असे मत बनले आहे.  वारकरी संप्रदायात संत तुकारामांनी सदेह वैकुंठगमन केले अशी एक कथा आहे. जेंव्हा त्यांना घ्यायला विमान येते तेंव्हा ते आपल्या पत्नी जिजाऊ ला देखील विमानात बसून वैकुंठाला घेऊन जाऊ इच्छितात. परंतु अध्यात्माचे आणि परमार्थाचे महत्त्व न कळलेली जिजाऊ वैकुंठाला जाण्यास नकार देते अशी कथा काही कीर्तनकार सांगतात.  वारकरी संप्रदायातील व्यक्तींना जिजाऊ हे एक परमार्थाची जाणीव नसलेले पात्र वाटते. परंतु खरंच जिजाऊ अशा होत्या का?


शेअर करा

अंधाराला छेदण्याची गरज आहे

शेअर करा

सोशल मीडियावरील कचऱ्यात कधीकधी खूप चांगले हिरे-माणिक सापडतात. ही अशीच एक कविता नाना पाटेकर च्या नावावर आहे.  नाना या कवितेचा कवी आहे की नाही हे पक्के माहीत नाही. पण कविता मात्र छान आहे.  आवडली आहे म्हणून तुमच्या सोबत शेअर करतोय


शेअर करा
books

पुस्तकं

शेअर करा

पुस्तक वाचणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला असं वाटत असतं की त्याच्या मुलाने/मुलीने देखील हा छंद जोपासावा. त्याने/तिने देखील पुस्तके वाचावी. त्यांनी पुस्तके का वाचावी याविषयी कवी सौमित्र याने खूप सुंदर कविता लिहून ठेवली आहे. एका अर्थाने पुस्तक वाचल्याने काय होते याविषयीचा सुंदर लेखच आहे हा. ही सुंदर कविता जाणकार वाचकांसाठी आणि कविता प्रेमींसाठी.


शेअर करा

किस्से वैज्ञानिकांचे

शेअर करा

वैज्ञानिकांचे जीवन प्रयोगशाळेत आणि प्रयोगशाळेबाहेर अनेक विस्मयकारक घटनांनी भरलेलं असतं. अशा घटनांचे किस्से तयार होतात. जितका वैज्ञानिक अधिक प्रसिद्ध तितके अधिक किस्से. त्यातून वैज्ञानिकांच मानवी स्वभावाचं, तंच बुद्धिमत्तेचं आणि मोठेपणाचं दर्शन घडत असतं. हे किस्से जसे गमतीदार असतात तसेच ते उद्बोधकही असतात. त्यामुळेच ते विज्ञानाच इतिहासाचा भाग बनून जातात. त्यातूनच त्यांचे महत्त्व अधोरेखित होतं. प्रसिद्ध वैज्ञानिकांच जीवनात घडलेले असे काही किस्से.


शेअर करा
essentially mira book review

हार न मानणारी स्त्री book review essentially mira book by author mira kulkarni

शेअर करा

लेखिका मीरा कुलकर्णी ही भारतातील सौंदर्यप्रसाधन निर्मितीतली फार मोठी उद्योजक. ‘फॉरेस्ट इसेन्शियल्स’ नावाच्या लग्झरी आयुर्वेदिक कंपनीची सीईओ. (या कंपनीची उत्पादने हयात, ताज अशा अनेक पंचतारांकित हॉटेल्समध्ये, राष्ट्रपती भवनातील अति महत्त्वाच्या सूट्समध्ये वापरली जातात.) ‘फॉच्र्युन इंडिया’च्या ‘मोस्ट पॉवरफुल बिझिनेस वुमन’च्या यादीत हिचं नाव सलग १० वर्ष झळकत होतं. हे सारं तिनं व्यक्तिगत आयुष्यातल्या ‘सिंगल मदर’ या कप्प्यातील सगळय़ा जबाबदाऱ्या पेलून करून दाखवलं. हे आत्मकथन आहे मीरा कुलकर्णीचं. ही कथा तिच्या वैयक्तिक आयुष्याची तर आहेच पण त्याहीपेक्षा जास्त तिच्यातल्या उद्योजकाच्या जन्माची आणि वाढण्याची आहे.


शेअर करा

How much discipline?

शेअर करा

यश मिळवणे, एखाद्या क्षेत्रात सर्वोच्च स्थान प्राप्त करणे आणि ते सातत्याने टिकवून ठेवणे हे सोपे काम नाही.

यश मिळवण्यासाठी किती कठोर मेहनत करावी लागते? किती त्याग करावा लागतो? किती शिस्तबद्ध जीवन जगावे लागते हे अशाच एका विजेत्याच्या अनुभवावरून .. त्याच्याच शब्दांत.


शेअर करा

माझा मराठवाडा

शेअर करा

मराठवाडा ही गौरवाने सांगण्याजोगा वारसा असणारी संतांची तशीच लढवय्यांची जमीन. विकासाची क्षमता असणारी जिद्दी माणसांची भूमी. पण आकांक्षा आहे महाराष्ट्राच्या गौरवात एकजीव होण्याची. मराठवाड्याचे निराळेपण संपावे ही. आणि खंत आहे याची की हे घडून येण्याऐवजी मराठवाडा या नावाने लढत राहणे आम्हांला भाग पाडले जात आहे याची. 


शेअर करा

भारताची उज्ज्वल ज्ञानपरंपरा

शेअर करा

प्रस्तुत पुस्तक हे ‘भारतीय ज्ञानाचा खजिना’ या मराठी पुस्तकाचा देविदास देशपांडे यांनी केलेला उत्तम अनुवाद आहे. भारताच्या ज्ञानपरंपरेत विविध प्रांतांमधून मिळालेल्या योगदानाची दखल पुस्तकात घेतली गेली आहे. लेखनासाठी प्राचीन भारतीय ग्रंथ, परदेशी प्रवाशांनी भारताबद्दल लिहून ठेवलेली निरीक्षणे, भारतीय आणि विदेशी अभ्यासकांच्या नोंदी यांचा आधार आहे. माहिती आणि रंजकता यांचा उत्तम मेळ असणारे हे पुस्तक भारताच्या ज्ञानवारशाकडे पुन्हा एकदा वळण्याची आवश्यकता अधोरेखित करते.


शेअर करा
error: