सुखाचा खरा पत्ता

शेअर करा

एका रेडिओ मुलाखतीदरम्यान निवेदकाने एका करोडपती पाहुण्यांना एक खूप साधा पण खोल प्रश्न विचारला, “सर, तुमच्या आयुष्यात तुम्हाला सर्वात जास्त आनंद कशामुळे मिळाला?”
त्यावर ते गृहस्थ शांतपणे हसले आणि सांगू लागले:
“असं बघा, आनंदाचा शोध घेताना मी आयुष्यात चार वेगवेगळ्या टप्प्यांतून गेलो, तेव्हा कुठे मला ‘खऱ्या सुखाचा’ अर्थ उमजला.


शेअर करा

सुखाचा खरा पत्ता Read More »

Marathwada Liberation Day

मराठवाडा मुक्ती संग्रामाचे महत्व

शेअर करा

प्रथम ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, हैदराबादचा लढा हा केवळ संस्थानच्या विलीनीकरणाचा लढा नाही तर तो भारताच्या प्रादेशिक सलगतेचा आणि भारताच्या भारत म्हणून अस्तित्वात येण्याच्या प्रयत्नाचा भाग आहे. केवळ एका संस्थानाच्या विलीनीकरणाचा लढा या नात्याने आपण आता या लढ्याकडे पाहता कामा नये.


शेअर करा

मराठवाडा मुक्ती संग्रामाचे महत्व Read More »

vilasrao_deshmukh3_gurhaal.com

तुम्ही जसा विचार मनात आणाल तसेच घडेल, आयुष्यात नेहमी सकारात्मक विचार करा – स्व.विलासराव देशमुख यांची एक आठवण

शेअर करा

मी निराश झालो होतो…कारण स्व.देशमुख यांच्यापर्यंत मला पोहोचताच आलं नव्हतं…स्व. देशमुख साहेब यांच्याशी आयुष्यात एकदा तरी हस्तांदोलन करायचच, एकदा तरी मुख्यमंत्र्यांना जवळून भेटायचच हा मनोमन निर्धार त्याक्षणी केला…स्व.विलासराव देशमुख यांचं हेलिकॉप्टर पुन्हा गर गर उडत आकाशात गुडूप झालं…मी आकाशाकडेच पाहत राहिलो…हेलिकॉप्टरच्या पंखाचा आवाज कानात घुमत होता, आणि माझा निर्धार आणखी पक्का होत होता…


शेअर करा

तुम्ही जसा विचार मनात आणाल तसेच घडेल, आयुष्यात नेहमी सकारात्मक विचार करा – स्व.विलासराव देशमुख यांची एक आठवण Read More »

vilasrao_deshmukh1_gurhaal.com

“त्यासाठीच कर्तुत्ववान व्हा…” – स्व.विलासराव देशमुख यांची एक आठवण

शेअर करा

त्यावर साहेबानी अतिशय मार्मिक उत्तर दिले होते…”मोठेपणा हा कधी स्वतःहून घ्यायचा नसतो…तो दुसऱ्यांनी द्यायला हवा…आणि त्यासाठीच कर्तुत्ववान व्हा…

“आज गल्ली तले “राव, भाऊ, शेट, दीदी, दादा, नेते, सरकार ” ही विशेषण लावणारे पुढारी कुठे….आणि विलासराव साहेब कुठे…??


शेअर करा

“त्यासाठीच कर्तुत्ववान व्हा…” – स्व.विलासराव देशमुख यांची एक आठवण Read More »

पक्षी

शेअर करा

आपली आई आपला पहिला गुरू असते. कारण बाळाची या जगाशी ओळख ती घडवून आणते. या जगाशी संवाद साधण्यासाठी बाळाला बोलण्यासही तीच शिकवते. तिच्याशी बोलता बोलताच बाळ भाषा शिकतो. म्हणूनच त्या पहिल्या भाषेला मातृभाषा असे सार्थ नाव आहे.
आपल्या बाळाला पक्ष्यांची ओळख करून देण्यासाठी आईने गायलेले हे गीत आणि यासारखे अनेक गीते मराठी भाषेचा अनमोल ठेवा आहे.


शेअर करा

पक्षी Read More »

ख्रिस्ती मिशनरी हिंदूच्या मूर्तिपूजेचा उपहास करतांना

प्रार्थना समाज आणि महाराष्ट्रातील प्रबोधनाची सुरुवात

शेअर करा

यातूनच मिशनरी मंडळींचा खोटेपणा आणि त्यांच्या तर्का मागील फोलपणाही त्यांना जाणवायला सुरुवात झाली. बायबलमधील चमत्कारिक व अप्रमाण वाटणाऱ्या बाबीदेखील विचारवंतांच्या लक्षात आल्या. त्यामागचा धर्मांतराचा गुप्त आणि लबाड हेतु त्यांना जाणवल्याशिवाय राहिला नाही. या सर्व गोष्टींमुळे आपल्या धर्माचा त्याग (धर्मांतर) करण्या ऐवजी आपल्या धर्माची आणि समाजाची नव्या युगाला साजेशी सुधारणा करण्याचा विचार समोर आला.


शेअर करा

प्रार्थना समाज आणि महाराष्ट्रातील प्रबोधनाची सुरुवात Read More »

कोहिनूर हिरा आणि दिल्लीतील भीषण कत्तल

शेअर करा

नादिरशहा अक्षरश चवताळला. नादिरशहा ने इतिहासात कुप्रसिध्द असलेली ‘दिल्लीची कत्तल’ घडवून आणली. त्याने आपल्या सैन्यास दिल्लीत सरसकट कत्तल करण्याचा हुकूम दिला. तो 22 मार्च 1739 ला सुनहरी मशिदीत आला. नगारे आणि तुतारींच्या घोषात त्याने आपल्या सैनिकांसमोर आपली तलवार म्यानातून बाहेर काढून हवेत उंच धरली. सैनिकांसाठी हा कत्ल-ए-आम चा आदेश होता. हजारो शस्त्रधारी सैनिक रस्त्यावर उतरले आणि दिसेल त्याची कत्तल करत सुटले. हजारो निष्पाप नागरिक यात मारल्या गेले. प्रचंड प्रमाणात मालमत्तेची जाळपोळ आणि नासधूस झाली. दिल्ली अक्षरशः बेचिराख करण्यात आली. दिल्लीचा बादशाह मोहम्मद शाह रंगीला याला अक्षरशः जीवाची भीक मागावी लागली. काही तासांनी जेंव्हा नादीर ने पुन्हा आपली तलवार म्यान केली तेंव्हाच ही कत्तल थांबली. असे म्हणतात की दिल्ली सतत 57 दिवस जळत होती. एका अंदाजानुसार, काही तासातच सुमारे 20 ते 30 हजार बायका पुरुष आणि लहान मुलेदेखील या कत्तलीत मारल्या गेली. जवळ जवळ 10 हजार बायका पोरांना गुलाम करण्यात आले.


शेअर करा

कोहिनूर हिरा आणि दिल्लीतील भीषण कत्तल Read More »

केशाने आज कंपनीचे नाव राखले

शेअर करा

शनिवार उजाडला. रात्री दहाला खेळ सुरू झाला. पडदा उचलला गेला. नाचणाऱ्या वल्लरीच्या ऐवजी, शांत आणि संयमी शारदेच्या रुपात केशवचे स्टेजवर आगमन झाले. केशवचा प्रवेश एवढी प्रभावशाली होती की ते टाळ्यांच्या कडकडाट झाला. नाटक उत्तरोत्तर रंगत गेले. प्रत्येकाने जीव ओतून काम केले. केशवने गायलेल्या प्रत्येक गाण्यासाठी ‘वन्स मोअर’’ आला. विशेषतः ‘मूर्तिमंत भीती उभी’ या हे पद तर इतके रंगले की त्याला सलग, सहा वेळा ‘वन्स मोअर’ मिळाला.

परंतु, यामुळे बारा वर्षाचा केशव थकून गेला. पहिलाच दिवस आणि इतके गायन. थकवा अपरिहार्य होता. शेवटी व्यवस्थापक म्हैसकर स्टेजवर आले आणि त्यांनी केशवच्या वयाचा आणि प्रकृतीचा विचार करावा अशी सर्वांना विनंती केली.

“एक शेवटचा वन्स मोअर रे म्हैसकर!” शाहू महाराजांनी त्यांच्या आसनावरून ओरडले. केशव गायला. महाराज आणि सभागृह मंत्रमुग्ध झाले.


शेअर करा

केशाने आज कंपनीचे नाव राखले Read More »

sant_tukaram

वीट

शेअर करा

‘प्रभात, चा संत तुकाराम हा चित्रपट पाहून बऱ्याच जणांचे असे मत बनले आहे.  वारकरी संप्रदायात संत तुकारामांनी सदेह वैकुंठगमन केले अशी एक कथा आहे. जेंव्हा त्यांना घ्यायला विमान येते तेंव्हा ते आपल्या पत्नी जिजाऊ ला देखील विमानात बसून वैकुंठाला घेऊन जाऊ इच्छितात. परंतु अध्यात्माचे आणि परमार्थाचे महत्त्व न कळलेली जिजाऊ वैकुंठाला जाण्यास नकार देते अशी कथा काही कीर्तनकार सांगतात.  वारकरी संप्रदायातील व्यक्तींना जिजाऊ हे एक परमार्थाची जाणीव नसलेले पात्र वाटते. परंतु खरंच जिजाऊ अशा होत्या का?


शेअर करा

वीट Read More »

अंधाराला छेदण्याची गरज आहे

शेअर करा

सोशल मीडियावरील कचऱ्यात कधीकधी खूप चांगले हिरे-माणिक सापडतात. ही अशीच एक कविता नाना पाटेकर च्या नावावर आहे.  नाना या कवितेचा कवी आहे की नाही हे पक्के माहीत नाही. पण कविता मात्र छान आहे.  आवडली आहे म्हणून तुमच्या सोबत शेअर करतोय


शेअर करा

अंधाराला छेदण्याची गरज आहे Read More »

error: