Yerwali येरवाळी

साधारण 90 च्या दशक आधी ज्यांचा जन्म झालेला आहे त्यांनी हा शब्द अनेकवेळा ऐकलेला असेल. 90 च्या नंतर जन्मलेल्या अनेकांच्या कानावरून हा शब्द गेला असण्याचा संभव देखील आहे. ग्रामीण भागातल्या व्यक्तीकडून तो कधीतरी आपण ऐकलेला असणार. “येरवाळीच निघालो होतो. तेंव्हा कुठं संध्याकाळ होईपर्यंत पोचलो.” असं वाक्य किंवा “उद्या येरवाळीच निघावं लागेल” असं वाक्य मी आणि माझ्यासारख्यांनी अनेकदा ऐकलेलं आहे.

Bhagune or bhagone भगूने अथवा भगोणे

पूर्वीच्या काळी शेतकरी कुटुंबात एखादे धातूचे पातेले असायचे. पितळ, जर्मल किंवा स्टेनलेस स्टील चे. बाकी भांडी ही मातीची असायची. अर्थातच घराची कारभारीण हे भांडे अनेक कामासाठी वापरायची. पाहुण्यांचे चहापाणी यात व्हायचे, भाकरी करताना पिठात पाणी घालण्यासाठी याचा वापर व्हायचा. एखादे कालवण, कोरड्यास या भगोण्यात बनवले जायचे. भाज्यांचे किंवा सांडग्याचे पीठ कालवण्यासाठी याचा उपयोग व्हायचा. असे हे भगोणे त्या कारभरणीला हरघडी उपयोगी पडायचे.

Khallakada waralakada खाल्लाकडं म्हणजे काय रे पप्पा?

उद्या माझ्या मुलाच्या किंवा त्याच्या मुलाच्या कानावर हा शब्द पडलाच आणि त्याच्याही डोक्यात असाच किडा वाळवळला. आणि त्याने जर आपल्या बापाला विचारले की- “खाल्लाकडं म्हणजे काय रे पप्पा?” तर त्याला याचे उत्तर सांगणारे कोण असेल?

OPEN- an autobiography of Andre Agassi हानिकारक बापू – आंद्रे आगासी चे आत्मचरित्र

गेल्या दोन-तीन महिन्यात चार चांगली पुस्तके वाचण्यात आली. त्यापैकीच एक म्हणजे आंद्रे आगासी ची ऑटोबायोग्राफी “OPEN”. लहानपणापासून तर त्याचा टेनिस मधून निवृत्ती पर्यंतचा काळ खूप छान शब्दबद्ध केलाय. मला टेनिस ची आवड मी नववी दहावीत असताना लागली. त्यामुळे त्याचा टेनिस मधला सुरुवातीचा प्रवास वाचताना खूप मजा आली. अक्षरशः माझ बालपण पुन्हा माझ्या डोळ्यासमोरून तरळले. पुस्तक खूप छान आहे, संधी मिळाली तर जरूर वाचा.

What is IPO? आयपीओ म्हणजे काय?

सगळ्याच कंपन्यां शेअर मार्केटमध्ये लिस्टेड नसतात. परंतु जेव्हा एखादी कंपनी आपले शेअर शेअर मार्केट मध्ये ते खरेदी साठी उपलब्ध करण्याचे ठरवते तेव्हा त्या कंपनीला सर्वप्रथम शेअर मार्केट मध्ये स्वतःला नोंदणीकृत करावे लागते. एखादी कंपनी जेव्हा आपले शेअर्स बाजारांमध्ये विक्रीसाठी पहिल्यांदाच आणते तेव्हा त्याला …..

What is ”Share’? शेअर म्हणजे काय?

जो व्यक्ती कंपनीचे शेअर खरेदी करतो तो आपला पैसा कंपनीला वापरण्यासाठी देतो. त्याबदल्यात त्याला शेअर्स ची मालकी मिळते. कंपनीला हा पैसा एकदा मिळाला म्हणजे नेहमीसाठी वापरण्यास मिळतो. हा पैसा गुंतवणूकदारास परत करायची गरज नसते. तसेच यावर कुठले व्याजही देणे बंधनकारक नसते. तरीदेखील सामान्य गुंतवणूकदार कंपन्यांचे शेअर खरेदी करून गुंतवणूक करतात. यामध्ये सामान्य गुंतवणूकदारांचा काय फायदा?

Mama Shree मामाश्री

मामांश्रींशी आमची पहिली ओळख आणि भेट तशी पाटील कॉलनीतच झाली. (खरं तर ते माझे काकाश्री. पण शिंदे परिवारातील सगळे मामाश्री म्हणायचे म्हणून मी देखील मामाश्री म्हणतो.) नंतर उस्मानपुऱ्यात होणाऱ्या वेगवेगळ्या कार्यक्रमात, निवांतपणे होणाऱ्या भेटींमध्ये मग मामाश्री हळू हळू समजायला लागले. वयस्कर पण शरीरावर वयाचा प्रभाव न जाणवू देणारी अंगकाठी, साधी पण समोरच्याच्या अंतःकरणात उतरून ठाव …

Mama Shree मामाश्री Read More »

Chandrabhga Aaji चंद्रभागा आजी

कधी कधी मला वाटतं की आजीचं आयुष्य म्हणजे जणू काही संत तुकारामाच्या अवलीचे प्राक्तन. संत तुकारामाच्या आवलीचं जसं झालं तसंच आजीच्याही वाट्याला आलं. काय म्हणून केलं नाही तिने तुकोबांसाठी? या आवलीने देवभक्तीत रंगलेल्या, घर-संसार विसरलेल्या तुकारामाची संसाराची सगळी आघाडी सांभाळली. भांडाऱ्याच्या डोंगरात काटे कुटे तुडवीत तुक्याच्या भुकेची भाकर झाली. महिनोन्महिने नामस्मरणात दंग तुकोबांचा संसार सांभाळला. पोराबळांचे सर्व काही पाहिले. तुकाराम महाराज वारीला गेल्यावर त्यांच्या येण्याची वाट पहात सर्व कर्तव्ये पार पाडली. आलेल्या संतमंडळींना कोंड्याचा मांडा करून खाऊ घातले. अडचण असून देखील नवऱ्या साठी मावंदे देखील घातले. गाभण जनावरांची आई झाली. एवढेच काय त्यांच्यासाठी वैकुंठाचा मोह टाळला. सर्वांना तिचा राग दिसला पण त्याग मात्र दिसला नाही. तुकाराम संत बनून सर्वांच्या नमस्कारास पात्र झाले. पण आवली मात्र उपेक्षितच राहिली. तुझीही कहाणी काहीशी अशीच आहे आजी. तूझ नाव चंद्रभागा. विठुरायाच्या गजरात चंद्रभागेच्या वाळवंटाकडे कुणाचं लक्षच गेलं नाही आजी.

KANAA by Kusumagraj कणा

सर्व काही उध्वस्त झाल्यावर देखील काही माणसे हरत नाहीत, हरवत नाहीत. परिस्थितीशी समझौता करत नाहीत. ती पुन्हा उभी राहतात. नव्याने. अशा लोकांचे एकच ब्रीदवाक्य असते. “पाठीवरती हात ठेवून फक्त ‘लढ’ म्हणा. आशा लोकांबद्दलची, त्यांच्या दुर्दम्य इच्छाशक्ती बद्दलची, त्यांचा आशावाद व्यक्त करणारी कुसुमाग्रजांची ‘कणा’ ही कविता.

Un Un Khichadi ऊन ऊन खिचडी

अशाच एका कुटुंबात एक मुलगी जेंव्हा नववधू म्हणून जाते. सहाजिकच तिला तिथे जुळून घेण्याला त्रास पडतो. आणि मग ती फक्त नवरा-बायको असं वेगळं राहायचं खूळ डोक्यात घेते. आणि एक एक करून एकत्र कुटुंबातल्या समस्यांचा पाढाच सांगायला सुरुवात करते. शेवटी नवर्याला पटवून ती वेगळं राहायला जाते. वेगळं राहायला लागल्यावर तिला अनेक समस्या येतात. आणि मग वेगळं राहण्यामधील सुख याबाबतीत तिचा अपेक्षा भंग कसा होतो याचे मजेदार वर्णन मो. दा. देशमुख किंवा मोरेश्वर देशमुख यांनी आपल्या ऊन ऊन खिचडी या कवितेत आपल्याला केले आहे

error: