शब्दार्थ

आपण दैनंदिन जीवनात रोज संभाषण करतो. हे संभाषण भाषेवाचून शक्य नाही. आणि भाषा शब्दांवाचून शक्य नाही. आपल्या रोजच्या बोलण्यात, लिहिण्यात असंख्य शब्द बोलले जातात.  यात अनेक शब्द असे असतात की आपण ते बोलण्याच्या ओघात ते वापरतो. परन्तु आपल्याला त्या शब्दांचा खरा अर्थ माहीत नसतो. त्या शब्दाला असणाऱ्या अनेक छटा माहिती नसतात. या शब्दांचा उगम माहिती नसतो.

शब्दांना जन्म असतो, शब्दांना प्रांत किंवा प्रदेश देखील असतो. अर्थनुसार त्याला ‘रुपडे’ असते, ज्याला आपण अर्थ छटा म्हणत असतो. शब्दांच्या मांडणीचे देखील सौंदर्य सामावलेले असते. ज्याला आपण शब्दकळा म्हणतो. शब्दांना  स्वतःची अशी जन्मभूमी असते. त्याच्या जन्माची गोष्ट असते. शब्दांना इतिहास देखील असतो. कधी कधी हजारो वर्षांचा.

शब्द प्रवासी देखील असतात, ते प्रवास करतात, एक प्रांतातून दुसऱ्या प्रांतात. त्यांच्या प्रवासाचे देखील किस्से असतात. आशा या शब्दांना आपण वापरतो खरे पण आपण त्यांच्याकडे किती दुर्लक्ष करतो. इतके की कधी कधी ते आपल्याला सोडून जातात. कायमचे.

असे कितीतरी शब्द आहेत जे नव्याने जन्मतात आणि त्याहूनही अनेक शब्द आहेत जे नामशेष होतात. समाज, राष्ट्र, संस्कृती, भाषेशिवाय शक्य नाही, भाषा शब्दांशिवाय शक्य नाही. म्हणूनव्ह संत मंडळींनी या शब्दांना रत्नांची उपमा दिली, शस्त्रांची उपमा दिली. अशी अनेक रत्ने आपण सहजपणे गमावली आहेत. गमावतो आहेत. कारण या रत्नांची किंमत आपल्याला नाही, त्यांचे सौंदर्य आणि मौलिकताच आपल्याला ठाऊक नाही. आशा शब्दरत्नांच्या सौंदर्याचा, त्यामागच्या कहाणीचा, त्याच्या इतिहासाच्या घेण्यासाठी हा छोटासा प्रयत्न.

आशा करतो तुम्हाला आवडेल.

  • Yerwali येरवाळी
    साधारण 90 च्या दशक आधी ज्यांचा जन्म झालेला आहे त्यांनी हा शब्द अनेकवेळा ऐकलेला असेल. 90 च्या नंतर जन्मलेल्या अनेकांच्या कानावरून हा शब्द गेला असण्याचा संभव देखील आहे. ग्रामीण भागातल्या व्यक्तीकडून तो कधीतरी आपण ऐकलेला असणार. “येरवाळीच निघालो होतो. तेंव्हा कुठं संध्याकाळ होईपर्यंत पोचलो.” असं वाक्य किंवा “उद्या येरवाळीच निघावं लागेल” असं वाक्य मी आणि माझ्यासारख्यांनी अनेकदा ऐकलेलं आहे.
  • Bhagune or bhagone भगूने अथवा भगोणे
    पूर्वीच्या काळी शेतकरी कुटुंबात एखादे धातूचे पातेले असायचे. पितळ, जर्मल किंवा स्टेनलेस स्टील चे. बाकी भांडी ही मातीची असायची. अर्थातच घराची कारभारीण हे भांडे अनेक कामासाठी वापरायची. पाहुण्यांचे चहापाणी यात व्हायचे, भाकरी करताना पिठात पाणी घालण्यासाठी याचा वापर व्हायचा. एखादे कालवण, कोरड्यास या भगोण्यात बनवले जायचे. भाज्यांचे किंवा सांडग्याचे पीठ कालवण्यासाठी याचा उपयोग व्हायचा. असे हे भगोणे त्या कारभरणीला हरघडी उपयोगी पडायचे.
  • Khallakada waralakada खाल्लाकडं म्हणजे काय रे पप्पा?
    उद्या माझ्या मुलाच्या किंवा त्याच्या मुलाच्या कानावर हा शब्द पडलाच आणि त्याच्याही डोक्यात असाच किडा वाळवळला. आणि त्याने जर आपल्या बापाला विचारले की- “खाल्लाकडं म्हणजे काय रे पप्पा?” तर त्याला याचे उत्तर सांगणारे कोण असेल?
error: