चिऊ चिऊ ये chiu chiu ye kau kau ye
इथं इथं बस रे मोरा बाळ घाली चारा चारा खा, पाणी पी एक पाय नाच रे मोरा … चिऊ चिऊ ये, काउ काउ ये चारा खा, पाणी पी बाळाच्या डोक्यावरून भुर्रकन् उडून जा …
चिऊ चिऊ ये chiu chiu ye kau kau ye Read More »
इथं इथं बस रे मोरा बाळ घाली चारा चारा खा, पाणी पी एक पाय नाच रे मोरा … चिऊ चिऊ ये, काउ काउ ये चारा खा, पाणी पी बाळाच्या डोक्यावरून भुर्रकन् उडून जा …
चिऊ चिऊ ये chiu chiu ye kau kau ye Read More »
आई आपल्या बाळासाठी बडबड गीत म्हणताना त्याला गोल आकार कुठल्या कुठल्या वस्तूंचा आहे हे देखील शिकवते आहे. ती त्याला सांगते की आठ गोल आहे माठ गोल आहे आणि सोन्याचं कड देखील गोल आहे.
अडगुलं मडगुलं adagula madgula sonyacha kadgula Read More »
‘प्रभात, चा संत तुकाराम हा चित्रपट पाहून बऱ्याच जणांचे असे मत बनले आहे. वारकरी संप्रदायात संत तुकारामांनी सदेह वैकुंठगमन केले अशी एक कथा आहे. जेंव्हा त्यांना घ्यायला विमान येते तेंव्हा ते आपल्या पत्नी जिजाऊ ला देखील विमानात बसून वैकुंठाला घेऊन जाऊ इच्छितात. परंतु अध्यात्माचे आणि परमार्थाचे महत्त्व न कळलेली जिजाऊ वैकुंठाला जाण्यास नकार देते अशी कथा काही कीर्तनकार सांगतात. वारकरी संप्रदायातील व्यक्तींना जिजाऊ हे एक परमार्थाची जाणीव नसलेले पात्र वाटते. परंतु खरंच जिजाऊ अशा होत्या का?
सोशल मीडियावरील कचऱ्यात कधीकधी खूप चांगले हिरे-माणिक सापडतात. ही अशीच एक कविता नाना पाटेकर च्या नावावर आहे. नाना या कवितेचा कवी आहे की नाही हे पक्के माहीत नाही. पण कविता मात्र छान आहे. आवडली आहे म्हणून तुमच्या सोबत शेअर करतोय
अंधाराला छेदण्याची गरज आहे Read More »
पुस्तक वाचणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला असं वाटत असतं की त्याच्या मुलाने/मुलीने देखील हा छंद जोपासावा. त्याने/तिने देखील पुस्तके वाचावी. त्यांनी पुस्तके का वाचावी याविषयी कवी सौमित्र याने खूप सुंदर कविता लिहून ठेवली आहे. एका अर्थाने पुस्तक वाचल्याने काय होते याविषयीचा सुंदर लेखच आहे हा. ही सुंदर कविता जाणकार वाचकांसाठी आणि कविता प्रेमींसाठी.
मी, आपण कोण आहोत खरोखर? अनेक जणांनी या आदिम प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला. अनेकांना आपले उत्तर सापडले देखील. असेच एक साधे सरल उत्तर या कवितेतही आहे. सुरुवात जरी नेती-नेती च्या सुरात तू ही नाहीस तू ते नाहीस अशी असली तरी नंतर मात्र कवितेने एखाद्या व्यक्तिमत्वाचा अंतस्थ धांडोळा घेणाऱ्या गोष्टींना गौरवान्वित करत ‘कोहम’ (who am I?) चे सुंदर उत्तर प्रस्तुत केले आहे. जाता जाता कवि ही देखील सांगून जातो की बेगडी गोष्टींच्या मागे लागल्यामुळे तू मूळ कोण आहेस याची आत्मविस्मृती तुला झाली आहे.
आपली शाळा आणि बालपणीच्या शाळे विषयीच्या आठवणी या कवितेतून कवि कबीर यांनी सादर केल्या आहेत. आपल्याला ही कविता निश्चित आवडेल अशी आशा.
भगवद गीता जरी वेदांत तत्वज्ञानाचे सार असले तरी त्याहीपेक्षा कमी शब्दांमध्ये वेदांत तत्वज्ञानाचे सार स्वतः शंकराचार्यांनी सांगून ठेवलेले आहे. हे सार त्यांनी केवळ सहा कडव्यांमध्ये सांगून टाकले. या सहा कडव्यानाच षटकम् असे म्हटले आहे. आणि या षटकांमध्ये आत्म म्हणजे काय किंवा मी कोण आहे हे सांगितले असल्यामुळे यालाच ‘आत्मषटकम्’ असेही म्हणतात. आत्म्याचे स्वरूप जाणून घेतल्यावर निर्वाण प्राप्त होते. त्यामुळे याला ‘निर्वाण षटकम्’ असेही नाव आहे.
nirvaan-shatakam-निर्वाण-षटकम्/ Read More »
सर्व काही उध्वस्त झाल्यावर देखील काही माणसे हरत नाहीत, हरवत नाहीत. परिस्थितीशी समझौता करत नाहीत. ती पुन्हा उभी राहतात. नव्याने. अशा लोकांचे एकच ब्रीदवाक्य असते. “पाठीवरती हात ठेवून फक्त ‘लढ’ म्हणा. आशा लोकांबद्दलची, त्यांच्या दुर्दम्य इच्छाशक्ती बद्दलची, त्यांचा आशावाद व्यक्त करणारी कुसुमाग्रजांची ‘कणा’ ही कविता.
KANAA by Kusumagraj कणा Read More »