nirvaan-shatakam-निर्वाण-षटकम्/

भगवद गीता जरी वेदांत तत्वज्ञानाचे सार असले तरी त्याहीपेक्षा कमी शब्दांमध्ये वेदांत तत्वज्ञानाचे सार स्वतः शंकराचार्यांनी सांगून ठेवलेले आहे. हे सार त्यांनी केवळ सहा कडव्यांमध्ये सांगून टाकले. या सहा कडव्यानाच षटकम् असे म्हटले आहे. आणि या षटकांमध्ये आत्म म्हणजे काय किंवा मी कोण आहे हे सांगितले असल्यामुळे यालाच ‘आत्मषटकम्’ असेही म्हणतात. आत्म्याचे स्वरूप जाणून घेतल्यावर निर्वाण प्राप्त होते. त्यामुळे याला ‘निर्वाण षटकम्’ असेही नाव आहे.