इतिहास

Marathwada Liberation Day

मराठवाडा मुक्ती संग्रामाचे महत्व

शेअर करा

प्रथम ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, हैदराबादचा लढा हा केवळ संस्थानच्या विलीनीकरणाचा लढा नाही तर तो भारताच्या प्रादेशिक सलगतेचा आणि भारताच्या भारत म्हणून अस्तित्वात येण्याच्या प्रयत्नाचा भाग आहे. केवळ एका संस्थानाच्या विलीनीकरणाचा लढा या नात्याने आपण आता या लढ्याकडे पाहता कामा नये.


शेअर करा

मराठवाडा मुक्ती संग्रामाचे महत्व Read More »

ख्रिस्ती मिशनरी हिंदूच्या मूर्तिपूजेचा उपहास करतांना

प्रार्थना समाज आणि महाराष्ट्रातील प्रबोधनाची सुरुवात

शेअर करा

यातूनच मिशनरी मंडळींचा खोटेपणा आणि त्यांच्या तर्का मागील फोलपणाही त्यांना जाणवायला सुरुवात झाली. बायबलमधील चमत्कारिक व अप्रमाण वाटणाऱ्या बाबीदेखील विचारवंतांच्या लक्षात आल्या. त्यामागचा धर्मांतराचा गुप्त आणि लबाड हेतु त्यांना जाणवल्याशिवाय राहिला नाही. या सर्व गोष्टींमुळे आपल्या धर्माचा त्याग (धर्मांतर) करण्या ऐवजी आपल्या धर्माची आणि समाजाची नव्या युगाला साजेशी सुधारणा करण्याचा विचार समोर आला.


शेअर करा

प्रार्थना समाज आणि महाराष्ट्रातील प्रबोधनाची सुरुवात Read More »

कोहिनूर हिरा आणि दिल्लीतील भीषण कत्तल

शेअर करा

नादिरशहा अक्षरश चवताळला. नादिरशहा ने इतिहासात कुप्रसिध्द असलेली ‘दिल्लीची कत्तल’ घडवून आणली. त्याने आपल्या सैन्यास दिल्लीत सरसकट कत्तल करण्याचा हुकूम दिला. तो 22 मार्च 1739 ला सुनहरी मशिदीत आला. नगारे आणि तुतारींच्या घोषात त्याने आपल्या सैनिकांसमोर आपली तलवार म्यानातून बाहेर काढून हवेत उंच धरली. सैनिकांसाठी हा कत्ल-ए-आम चा आदेश होता. हजारो शस्त्रधारी सैनिक रस्त्यावर उतरले आणि दिसेल त्याची कत्तल करत सुटले. हजारो निष्पाप नागरिक यात मारल्या गेले. प्रचंड प्रमाणात मालमत्तेची जाळपोळ आणि नासधूस झाली. दिल्ली अक्षरशः बेचिराख करण्यात आली. दिल्लीचा बादशाह मोहम्मद शाह रंगीला याला अक्षरशः जीवाची भीक मागावी लागली. काही तासांनी जेंव्हा नादीर ने पुन्हा आपली तलवार म्यान केली तेंव्हाच ही कत्तल थांबली. असे म्हणतात की दिल्ली सतत 57 दिवस जळत होती. एका अंदाजानुसार, काही तासातच सुमारे 20 ते 30 हजार बायका पुरुष आणि लहान मुलेदेखील या कत्तलीत मारल्या गेली. जवळ जवळ 10 हजार बायका पोरांना गुलाम करण्यात आले.


शेअर करा

कोहिनूर हिरा आणि दिल्लीतील भीषण कत्तल Read More »

केशाने आज कंपनीचे नाव राखले

शेअर करा

शनिवार उजाडला. रात्री दहाला खेळ सुरू झाला. पडदा उचलला गेला. नाचणाऱ्या वल्लरीच्या ऐवजी, शांत आणि संयमी शारदेच्या रुपात केशवचे स्टेजवर आगमन झाले. केशवचा प्रवेश एवढी प्रभावशाली होती की ते टाळ्यांच्या कडकडाट झाला. नाटक उत्तरोत्तर रंगत गेले. प्रत्येकाने जीव ओतून काम केले. केशवने गायलेल्या प्रत्येक गाण्यासाठी ‘वन्स मोअर’’ आला. विशेषतः ‘मूर्तिमंत भीती उभी’ या हे पद तर इतके रंगले की त्याला सलग, सहा वेळा ‘वन्स मोअर’ मिळाला.

परंतु, यामुळे बारा वर्षाचा केशव थकून गेला. पहिलाच दिवस आणि इतके गायन. थकवा अपरिहार्य होता. शेवटी व्यवस्थापक म्हैसकर स्टेजवर आले आणि त्यांनी केशवच्या वयाचा आणि प्रकृतीचा विचार करावा अशी सर्वांना विनंती केली.

“एक शेवटचा वन्स मोअर रे म्हैसकर!” शाहू महाराजांनी त्यांच्या आसनावरून ओरडले. केशव गायला. महाराज आणि सभागृह मंत्रमुग्ध झाले.


शेअर करा

केशाने आज कंपनीचे नाव राखले Read More »

शिवरायांचे आज्ञापत्र Shivaji Maharaj’s Vision of forest conservation and tree plantation

शेअर करा

छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या राज्यातील जंगल संपत्ती,निसर्ग संपत्ती कमी होऊ नये म्हणून एक आज्ञापत्रच काढले होते.आपल्या राज्यातील निसर्गदत्त जंगल संपत्तीची, वृक्षठेव्याची कशी काळजी घ्यावी, याविषयी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार स्पष्टपणे या आज्ञापत्रात मांडले आहेत.आधुनिक काळाप्रमाणे प्रदूषण किंवा पर्यावरणाचा असमतोल नसणाऱ्या त्यांच्या काळातही त्यांनी वृक्षसंपत्तीचे मोठेपण जाणून घेतले होते. गडावरील वृक्ष संवर्धनाबाबतच्या या आज्ञापत्रावरून त्यांची पर्यावरणाबाबतची दूरदृष्टी दिसून येते.


शेअर करा

शिवरायांचे आज्ञापत्र Shivaji Maharaj’s Vision of forest conservation and tree plantation Read More »

indira gandhi and Yashpal Kapoor

यशपाल कपूर यांची साक्ष आणि उलट तपासणी

शेअर करा

जेव्हा खटल्यातील साक्षीदारांच्या जबान्या सुरू झाल्या तेव्हा सर्वात प्रथम आणि सर्वात महत्त्वाचा साक्षीदार श्री यशपाल कपूर यांचे देखील साक्ष कोर्टामध्ये झाली तिचा हा इतिवृतान्त


शेअर करा

यशपाल कपूर यांची साक्ष आणि उलट तपासणी Read More »

5. इंदिरा गांधी आरोपीच्या पिंजऱ्यात Indira Gandhis Statement and Cross examination in Allahabad High court

शेअर करा

जेव्हा इंदिरा गांधी साक्षीदार म्हणून येण्याचे ठरले तेंव्हा हा खटला एकदम प्रकाश झोतात आला. प्रसार माध्यमांची उत्सुकता शिगेला पोचली. देशाच्या इतिहासात तोपर्यंत कधीही पंतप्रधान पदासारख्या अत्यंत महत्त्वाच्या पदावरील व्यक्ती साक्षीदार म्हणून कुठल्याही कोर्टासमोर उभा राहिला नव्हता


शेअर करा

5. इंदिरा गांधी आरोपीच्या पिंजऱ्यात Indira Gandhis Statement and Cross examination in Allahabad High court Read More »

4. निळी पुस्तिका आणि विशेषाधिकार BLUE BOOK and State Privileges

शेअर करा

इंदिरा गांधींनी सरकारी यंत्रणेचा गैरवापर केला की नाही हे ठरवण्यासाठी ही कागदपत्रे महत्वाची आहेत असे श्री  शांतीभूषण यांना वाटत होते. सरकारने असे करण्यास नकार दिला.  कारण सांगितले की ही कागदपत्रे द्यावी की नाहीत  यासंबंधी राज्याला (state) काही विशेष अधिकार (Privileges) आहेत. ज्या कागदपत्रांची मागणी राजनारायण यांचा पक्ष करत होता त्याला नाव होते ब्लू बुक (BLUE BOOK).  आणि त्यामध्ये पंतप्रधान प्रवासात किंवा दौऱ्यावर असताना त्यांच्या संरक्षणासाठीचे नियम आणि मार्गदर्शक सूचना समाविष्ट होत्या. या पुस्तिकेत असे नमूद होते की पंतप्रधान दौऱ्यावर असताना संबंधित राज्याने त्यांच्या संरक्षणाचा आणि त्यांच्या बैठका आणि सभांची व्यवस्था  करायची. या व्यवस्थेचा खर्च देखील ज्या राज्यात हा दौरा आहे त्या राज्याने करायचा. पंडित जवाहरलाल नेहरू आणि लालबहादूर शास्त्री पंतप्रधान पदावर असेपर्यंत असाच दंडक होता.


शेअर करा

4. निळी पुस्तिका आणि विशेषाधिकार BLUE BOOK and State Privileges Read More »

3. पुनः सर्वोच्च न्यायालयात Raj Narain Appealed in Supreme Court

शेअर करा

सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे नमूद केले की या खटल्यामधील पॅराग्राफ 5 हा अजिबात अस्पष्ट किंवा संदिग्ध नाही. त्याच बरोबर न्यायमूर्ती ब्रूम यांनी यशपाल कपूर यांच्याशी संबंधित काढून टाकलेल्या महत्त्वाच्या इंट्रोगेटरी (प्रश्नावल्या) सुप्रीम कोर्टा ने पुन्हा खटल्यामध्ये समाविष्ट केल्या. न्या. ब्रुम यांच्या अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला त्यांनी चुकीचे ठरवले. एकंदरीतच राजनारायण पक्षाचे पारडे पुनः एकदा जड झाले.


शेअर करा

3. पुनः सर्वोच्च न्यायालयात Raj Narain Appealed in Supreme Court Read More »

Raj Narain vs Indira Gandhi

2. खटल्यास सुरुवात Election Petition against Indira Gandhi

शेअर करा

परंतु राज नारायण यांनी आपल्याकडे आशा वकिलांना देण्यासाठी पैसे नाहीत असे सांगितले. परंतु नंतर राज नारायण यांनी उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री श्री सी. बी. गुप्ता यांची भेट घेतली. गुप्ता आणि श्री शांतीभूषण यांचे चांगले संबंध होते.  हा आधार घेऊनच श्री शांतीभूषण यांनी राजनारायण यांचा खटला लढवावा अशी गळ त्यांना गुप्ता यांच्याद्वारे घालण्यात आली आणि ती त्यांनी मान्य केली.


शेअर करा

2. खटल्यास सुरुवात Election Petition against Indira Gandhi Read More »

error: